आता कुठेही आणि कशीही वाहनं उभी केल्यास अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. कारण बेकायदेशीरपणे पार्कींग करून ठेवलेल्या वाहनांवर अधिक दंड आकारला जाणार आहे. बेकायदेशीरपणे उभी केलेली वाहनं टोईंग करून नेली जातात. यासाठी आकारल्या जाणा-या दंडामध्ये गेल्या १० वर्षात कोणतेही बदल झाले नव्हते. या दंडापोटी होणा-या महसुलावर जीएसटी भरावा लागतो. त्यामुळं ही दंडात्मक रक्कम वाढवण्याचा निर्णय वाहतूक पोलीसांनी घेतला आहे. मात्र ही रक्कम मुंबई आणि पुणे यापेक्षा कमी असेल असा वाहतूक विभागाचा दावा आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या टोईंगासाठी आता जीएसटीही द्यावा लागणार आहे. टोईंगच्या कारवाईला शिस्त लावण्यासाठी जे करार करण्यात आले आहेत त्यात अनेक अटींचा सामावेश करण्यात आला आहे त्यामुळं खर्चातही वाढ होणार आहे. टोईंगसाठी होणा-या दंडात करण्यात आलेल्या वाढीचं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी समर्थन केलं आहे. ही कारवाई टाळण्यासाठी वाहन चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.