अवैध रेती उत्खनन प्रकरणात साडेचार कोटीहून अधिक रक्कमेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. उपविभागीय ठाणे आणि तहसीलदार ठाणे यांच्या कार्यालयाने संयुक्त अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या लोकांवर मुंब्रा येथे कारवाई करण्यात आली त्यात 5 बोटी पाण्यात जाळून टाकण्यात आल्या. 6 बार्ज बुडवण्यात आल्या, 8 सक्शन पंप बुडवण्यात आले. 3 मोठे 25 ब्रासचे बार्ज जप्त करून मुंब्रा गणेश घाट येथे कटींग साठी आणण्यात आले आहेत. ही कारवाई तहसीलदार युवराज बांगर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईत 4 कोटी 60 हजारांच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली.