सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी असताना देखील सिंगल युज प्लास्टिकचे वाढता वापर ही चिंतेची बाब असून या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असे तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले आहेत. याकरीता स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथके तयार करुन शहरातील महत्वाच्या ठिकाणी उदा. बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठ, भाजी मंडई, फुल मंडई या ठिकाणी भेटी देवून दोर्षींवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सिंगल युज प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करुन त्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दहा दिवसात सादर करावा असे देखील निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने सिंगल युज प्लास्टिकच्या बंदीची अंमलबजावणी करणे, हे आपले मिशन असल्याचे सिद्धेश कदम यांनी सांगितलं.