भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. खासदार कपिल पाटील फौंडेशन आणि हिंदू सेवा संघ यांच्या सहयोगातून आसनगावमध्ये १ हजार १०१ आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भावली धरणातील पाण्याच्या प्रश्नासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्यानं दूर करण्यात येतील असं सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ५ जोडप्यांना मंगळसूत्रं आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस तसंच जिंदाल कंपनीतर्फे संसारोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्यासंदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. याबाबतीत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.