वेदांत दास यांच्या मृत्यू प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे मतदाता जागरण अभियानातर्फे निदर्शनं करण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी वेदांत दास याचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला होता. कंत्राटदाराने अर्धवट केलेल्या कामाचा आणि राज्य रस्ते महामंडळाच्या अधिका-यांनी याच कामाचे न तपासता पैसे दिले म्हणून कंत्राटदार आणि अधिका-यांवर कारवाई करावी अशी अभियानाची मागणी होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सार्वजिनक बांधकाम मंत्री आहेत, रस्ते विकास महामंडळ त्यांच्या अखत्यारीत काम करते त्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन कंत्राटदार आणि संबंधित अधिका-यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली पाहिजे अन्यथा ते त्यांना वाचवण्याचं काम करत आहेत असं मानलं जाईल असं मत ठाणे मतदाता जागरण अभियानानं व्यक्त केलं आहे.