गेल्या सात महिन्यापासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली दीघा गाव आणि ऐरोली रेल्वे स्थानकात नागरिकांनी केलेल्या स्वाक्षरी आणि त्यांच्या प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वेप्रबंधक रजनीश गोयल यांना निवेदाद्वारे देण्यात आले आणि त्यांना लवकरात लवकर दिघा गाव रेल्वे स्थानक सुरू करा नाहीतर जन आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. त्यावेळी जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर ,उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, कृष्णा कोळी उपस्थित होते