मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदारांची नोंदणी झाल्याचं दिसत आहे. १ जानेवारी २०१९ ला १८ वर्ष पूर्ण होणा-या व्यक्तीस मतदार म्हणून नोंद करून घेण्यासाठी १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम आखण्यात आली होती. या मोहिमेत मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरूस्ती, नाव वगळणे, स्थलांतर अशा विविध गोष्टी करण्यात आल्या. या मोहिमेत राज्यामध्ये सर्वात जास्त नवीन मतदारांची नोंदणी ही जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत २ लाख ७७ हजार ८७४ नव मतदार नोंदणी अर्ज आले आहेत. मतदार वगळणीसाठी २४ हजाराहून अधिक तर मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी ४४ हजार ४५४ अर्ज आले आहेत. सर्वात जास्त अर्ज कल्याण ग्रामीण आणि कल्याण शहर विधानसभा मतदारसंघामध्ये प्राप्त झाले आहेत.