विधानसभा निवडणुकीसाठी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल झाला आहे. कालपासून विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. मात्र सध्या पितृ पंधरवडा असल्यामुळं फारसं कोणी नामनिर्देशन पत्र दाखल करेल असं दिसत नाही. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या भगवान भालेराव यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. येत्या ४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading