आपल्या खाऊच्या आणि बक्षीसाच्या पैशातून तिसरीतील चिमुरडीने केली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत

खाऊसाठी दररोज मिळणारे पैसे आणि अनेक स्पर्धांमधून बक्षिस मिळालेले पैसे न्यू गर्ल्स स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी कार्तिकी चव्हाण हिने कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले. २ हजार रूपयांची ही मदत तिने कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना दिली. कार्तिकीचे वडील किरण चव्हाण मराठी नाट्य मंडळाने पूरग्रस्तांना जमा केलेल्या साहित्याची पॅकींग करण्यासाठी गेले होते तेव्हा कार्तिकीच्या मनात आपणही मदत करू शकतो हा विचार आला आणि वृत्तवाहिन्यांवरील पूरग्रस्तांना मदतीच्या बातम्या पाहून तिलाही मदत करावीशी वाटली असं तिने सांगितलं. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसे जमा करण्यासाठी धनादेश सुपुर्द केला. एवढ्या लहान वयात असे विचार मनात येणं ही सुध्दा कौतुकास्पद गोष्ट आहे असं सांगून जिल्हाधिका-यांनी तिचं याबद्दल कौतुक केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading