गेले १५ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं तीन दिवसापासून जोरदार हजेरी लावली असून गेल्या २४ तासात १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेधशाळेनं १ सप्टेंबरलाच जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले काही दिवस पाऊस कोसळत आहे. कालपासून तर पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कालच्या पावसामुळं आज ठाण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली होती. ठाण्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे रूळांवर पाणी आल्यामुळे उपनगरीय सेवाही काही काळ ठप्प झाली होती.