ठाण्यातील मंगला हिंदी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भुवनेंद्र सिंह बिष्ट यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मंगला हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. तिथूनच ते मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. त्यांना लिहिण्या वाचण्याची लहानपणापासून आवड होती. त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे निवृत्तीनंतर पुस्तक काढले. त्यांचे पहिले पुस्तक साधना के स्वर त्यानंतर जीवनगंगा, जिंदगी के तेवर, गांधी काठी की छाव अशी अनेक पुस्तकं प्रकाशित झाली होती. त्यांच्या मागे दोन मुली, तीन मुलं असा परिवार आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील मान्यवर उपस्थित होते.