वेधशाळेनं जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. वेधशाळेनं जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेनं आज, उद्या आणि शुक्रवारी यलो अलर्ट दिला आहे तर गुरूवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाण्यात गेला आठवडाभर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसानं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं आहे. रोज संध्याकाळी ५ नंतर पाऊस जोरदार हजेरी लावत असून अवघ्या काही मिनिटातच पूर्ण ठाणे जलमय होत आहे. यामुळे सखल भागांबरोबरच पाणी न साठणा-या ठिकाणीही पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत.