सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांचा वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो. योजना राज्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, तरच हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रमांतर्गत शासकीय योजनांचा वितरण सोहळा आणि भव्य लाभार्थी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या मेळाव्यात कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, मातृत्व वंदन योजना, श्रावणबाळ योजना, सखी आरोग्य किट, आदी योजनेच्या लाभाचे सुमारे दहा हजारहून अधिक लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. यातील काही प्रातिनिधिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले. ठाण्यात रस्ते विकसित केले. त्याप्रमाणे कल्याणमध्ये चांगले रस्ते होण्यासाठी प्रकल्प बधितांना यूएलसीची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू असं श्रीकांत शिंदे यांनी सांगीतले.