शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी १२ तास बंद राहणार असून टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने पावसाळया अगोदर दैनंदिन देखभाल दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार असल्याने बुधवारी १५ जून रोजी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास ठाणे महापालिकेला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्या टप्प्याने शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी ठिकाणचा पाणी पुरवठा बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्र्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहील. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे असं महापालिकेने कळवलं आहे.