वीजेच्या खाजगीकरणाविरोधात वीज अधिकारी-अभियंता कर्मचारी संघर्ष कृती समितीतर्फे आजपासून पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या बंदचा फटका सध्या तरी शहरी भागात फारसा बसला नसला तरी ग्रामीण भागात मात्र या बंदचा परिणाम झाला आहे. हा बंद कोणत्याही वैयक्तीक मागणीसाठी नसून सामान्य जनहितासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचं समितीचं म्हणणं आहे. राज्यामध्ये सध्या विचित्र धोरणं असून या धोरणामध्ये खाजगीकरणालाच प्राधान्य दिलं जात आहे. उद्या अदानीचा वीज मंडळात शिरकाव झाल्यास दरवाढीवर कोणाचाच अंकुश राहणार नाही. यामुळं शासनानं समांतर परवाना देऊ नये अशी मागणी समितीनं केली आहे.