विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाला राष्ट्रीय अक्रेडिशन मिळाल आहे.हे राष्ट्रीय अक्रेडिशन तीन वर्षांसाठी आहे . देशभरामध्ये चारशेहून अधिक तंत्रनिकेतन आहेत यापैकी अवघ्या पाच टक्के तंत्रनिकेतनांना राष्ट्रीय अक्रेडिशन मिळालं आहे.त्यामध्ये आता विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाचा समावेश झाला आहे. एकीकडे राष्ट्रीय पातळीवर मंडळाचा गौरव होत असताना दुसरीकडे पालिका प्रशासनाने मात्र या महाविद्यालयाच पूर्ण आवार अधिग्रहित केल आहे. त्यामुळे जवळपास 12000 हून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढील काही काळासाठी तरी थांबल आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना पालिकेच्या कारवाईचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला आहे.