वर्तकनगर परिसरातील साईनाथ मंदिराच्या उत्सवासाठी प्रसाद म्हणून ३० टन लाडू बनवले जात आहेत. वर्तकनगर येथील साईनाथ मंदिराच्या ३३व्या वर्धापन दिनानिमित्त साईनाथ सेवा समितीतर्फे हे लाडू बनवण्यात येत आहेत. २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान साईनाथ मंदिराच्या ३३व्या वर्धापन दिनाचा महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवासाठी लाखो भाविक मंदिरात येण्याची शक्यता वर्तवली जात असून या भाविकांना प्रसाद म्हणून हे लाडू दिले जाणार आहेत. हे लाडू तयार करण्यासाठी १० टन चण्याची डाळ, साखर असं साहित्य वापरण्यात आलं आहे. या महोत्सवानिमित्त तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.