लॉकडाऊनमुळे ठाण्यातील कच-यात घट

लॉकडाऊनमुळे ठाण्यात जमा होणा-या कच-यात घट झाली असून नेहमीपेक्षा रोज सुमारे ३५० मेट्रीक टनने कच-यात घट झाल्याचं दिसून आलं आहे. लॉकडाऊनमुळे एकीकडे प्रदूषणात घट झाली असून दुसरीकडे कच-यातही घट झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात रोज सुमारे ९६३ मेट्रीक टन कचरा निर्माण होत होता. परंतु एप्रिल आणि मे या दोन महिन्यात यामध्ये दिवसाला ३५० मेट्रीक टन कच-याची घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे एकूण शहराचा वेग मंदावला असून तलाव खाडीतील प्रदूषणही कमी झालं आहे. तर सोसायटी, झोपडपट्टी भागातून निर्माण होणारा कचरा कमी झाला नसून कमर्शियल ठिकाणांचा कचरा कमी झाल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे. अनेक ठिकाणी भाजी मार्केट बंद आहेत, दुकाने, हॉटेल्स आदी बंद असल्यानं त्यांचा कचरा तयार होत नाही. त्यामुळं कच-याच्या निर्मितीवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading