रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी राजीनामा दिला आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेली १४ वर्ष तायडे अध्यक्षपद सांभाळत होते. पदाचा राजीनामा देताना तायडे यांनी वैयक्तीक कारण सांगितलं आहे. आता रामभाऊ तायडे पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.