राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध प्रकारचे २ हजार दावे निकाली

जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध प्रकारचे २ हजार दावे निकाली काढण्यात आले. जिल्हा आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या लोक न्यायालयात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील दाखल होण्यापूर्वीचे २० हजार ६०० तर जुने १ हजार ९३ असे ३१ हजाराहून अधिक दावे राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी २ हजार दावे निकाली काढण्यात आले. निकाली निघालेल्या ८३८ दाव्यांमध्ये २ कोटी ३९ लाख, १ हजार ९३ दाव्यांमध्ये २३ कोटी ६२ लाखांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ३२१ प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी १७४ प्रकरणात तडजोड झाली. यामध्ये एकूण १३ कोटी ५९ लाख रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading