राज्यात कठोर निर्बंध तर शनिवार-रविवारी कडक लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात उद्यापासून कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी करण्यात आली असून गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. मॉल, बार, रेस्टॉरंट बंद राहणार असून पार्सल सुविधा सुरु असेल. सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू राहील. सर्व उद्योग चालू राहणार असून उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. सर्व बांधकामे सुरु राहतील, सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार आहेत. भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील
शुटिंगवर गर्दी होणार नाही अशा ठिकाणी परवानगी असेल. चित्रपटगृहे बंद राहतील. सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहील. तर
राज्यात शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading