राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध दिवसा जमावबंदी तर रात्री ११ ते पहाटे ५ नाईट कर्फ्यू
रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी
राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही
लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी
अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद
स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद
पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार