राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना एका प्रकरणात अटक झाली आणि लगेच त्यांना जामीनही मंजूर झाला. अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुक वर टाकला होता. याप्रकरणी करमुसे यांना एप्रिल महिन्यात मारहाण करण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही सुरक्षारक्षकांनी ही बेदम मारहाण केल्याचा आरोप कलमुसे यांनी केला होता. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. आज या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयामध्ये त्यांना दहा हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. ही अटक म्हणजे कागदोपत्री अटक असून या प्रकरणी गोपीनीयता पाळण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचे वृत्त रात्री उशिरा बाहेर आलं मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर अशी प्रतिक्रिया या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading