भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाची महती सांगणारं रक्षाबंधन आज सर्वत्र उत्साहात आणि पारंपारिक पध्दतीनं साजरं झालं. हिंदू परंपरेनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरं केलं जातं. घराघरातून रक्षाबंधन पारंपरिक पध्दतीनं साजरं करण्यात आलं. यावेळी बहिणींनी आपल्या भावाला औक्षण करून राखी बांधली आणि नंतर नैवेद्याच्या गोडधोड पदार्थांचा आणि नारळी भाताच्या भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.