देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वच सण-उत्सवांवर पाणी फिरलं असून अगदी वर्षाचा शेवटही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होत आहे. नेहमी नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र मोठा उत्साह असतो. सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. नववर्ष स्वागतासाठी खास बेत, रंगीबेरंगी कार्यक्रम आखले जातात. वर्षाअखेरीस ठिकठिकाणी सरत्या वर्षाचे प्रतिकात्मक पुतळे तयार केले जातात आणि त्यांची रात्री बारा वाजता होळी केली जाते. काही ठिकाणी या पुतळ्यांच्या रूपानं नविन संकल्पही सोडले जातात. मात्र कोरोनामुळे यंदा या सर्वांवर पाणी फिरलं आहे.