महिला तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याची पालकमंत्रीची सूचना

महिला तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांना केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा संदर्भात एका बैठकीचा आयोजन केलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ठाण्यामध्ये एका रिक्षा चालकाने महाविद्यालयीन विद्यार्थीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला होता याची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्तांशी बोलून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, संबंधित तरुणांना तक्रार दाखल केल्यानंतर तीन पथक म्हणून आरोपीचा शोध घेतला गेला आणि त्याला अटक करण्यात आली. असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी शाळा महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्गाच्या परिसरात साध्या वेशातील महिलांची नेमणूक करणे तसेच बीट मार्शलच्या गस्तीचे प्रमाण वाढवण्याची सूचना पोलिसांना देण्यात आले आहेत. महाविद्यालयीन युवती सोबत अशा प्रकारच्या घटना वारंवार करणाऱ्यांना प्रतिबंधासाठी विशेष ग्रस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आले आहे. साताऱ्यामध्ये महिला सुरक्षा पथकाची पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आला होता. अशाच प्रकारचा प्रकल्प राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ठाणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या 112 या क्रमांकावरील प्रतिसादाचा वेळ राज्यात सर्वात अधिक आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पाच मिनिटाच्या आत पोलीस जागेवर पोहोचतात. मात्र कालच्यासारख्या दुर्दैवी घटना घडू नये यासाठी महिला तरुणींना सुरक्षितता वाटण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी पोलिसांना केली. पुण्यातील रिक्षा चालक भाडे नकारात असल्याची आणि जादा प्रवासी वाहतूक करत असल्याची असल्याच्या प्रश्नावर पोलीस आणि परिवार विभागाचे विभागाने समन्वयांना कारवाई करावी अशी सूचनाही त्यांनी केल्याचे सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading