खारघर येथे आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या 10 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जातं. तसेच 15 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींना खारघर सेंट्रल पार्कजवळील टाटा हॉस्पिटलमध्ये, तर काहींना पनवेल परिसरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उष्णता आणि लाखोंच्या जमावामुळे वातावरणातील आर्द्रता आणखी वाढली होती. त्यातच कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी झाल्याने १० जणांना जीव गमवावा लागल्याचं सांगितलं जातं.