भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त यथोचित सन्मान

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त यथोचित सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध जिल्ह्यातील नामनिर्देशित स्वातंत्र्यसैनिकांचा यथोचित सत्कार संबंधित स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानी जावून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने आज ठाणे उपविभागीय अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त यांच्या निवासस्थानी जावून त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राजदत्त यांची विचारपूस केली तसेच त्यांचा शाल देऊन यथोचित सन्मानही केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading