जिल्ह्याला पाणी पुरवठा भातसा आणि बारवी धरणात जवळपास ४० टक्के पाण्याचा साठा आहे. यावर्षी जून महिना कोरडाच गेल्यानं धरणांच्या पाणी साठ्यात विशेष वाढ झाली नाही. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात ३८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. म्हणजेच ४१ टक्के पाण्याचा साठा आहे. बारवी धरणाी पाणी साठवण्याची क्षमता ३३९ दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात १४६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. म्हणजेच ४३ टक्के इतका पाणीसाठा आहे.