भटक्या श्वानावर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय विकृत तरुणाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिने साधा तुरुंगवास आणि १ हजार ५० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हजुरी येथे राहणा-या या विकृताचे नाव विजय चाळके आहे. लॉकडाऊन काळात २१ जुलै रोजी पडवळनगर येथील पादचारी पुलावर त्याने भटक्या श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते अशी तक्रार किसननगर नं.१ येथील सागर गुप्ता या तरूणाने श्रीनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार प्राण्यांशी अनैसर्गिक संबधाचे कलम ३७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरिक्षक दिगंबर कोपरे यांनी आरोपीस अटक करून त्याचे विरूध्द सबळ पुराव्यासह १ सप्टेंबर रोजी ठाणे न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. याप्रकरणाचा अंतिम निकाल काल लागला असुन साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तरुणाला सहा महिने साधा तुरुंगवास आणि १ हजार ५० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.