बारवी धरण ५० टक्के भरलं

सध्या जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असून बारवी धरणही ५० टक्के भरलं आहे. बारवी धरणातून ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. जून महिन्यापासून हवा तसा पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाईची भीती व्यक्त होत होती. मात्र जुलै महिन्यापासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणी साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आत्तापर्यंत जवळपास ८६४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातल्या पाणी साठ्यातही चांगलीच वाढ झाली असून सध्या धरण ५० टक्के भरलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading