गेल्या काही दिवसांच्या अखंड जलधारेनंतर गेले दोन दिवस सूर्यानं दर्शन दिलं आहे. यामुळं तापमानात काहीशी वाढ झाली आहे. गेले काही दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली होती. या जोरदार पावसामुळे पाणी टंचाईची टांगती तलवारही दूर झाली. गेल्या दोन दिवसापासून कडक ऊन पडत आहे. यामुळं तापमानातही वाढ झाली असून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानं तापमानात ही वाढ झाल्याचं दिसत आहे.