यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण आज पहाटे शंभर टक्के भरले आहे.मोरबे धरणाची 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार झाल्याने पहाटे धरणाचे दोन्ही दरवाजे 15 सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहेत. ज्यामधून 675 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे.गणेशोत्सवात नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असून यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता पूर्णतः मिटली आहे.
You must be logged in to post a comment.