ठाण्यामध्ये मतदानाचा वेग हा सुरूवातीपासूनच संथ असल्याचं दिसत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची नोंद 25.10 टक्के इतकीच झाली आहे. मतदानाची एकूण गती पाहता 50 टक्केसुध्दा मतदान होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. मतदारांनी मतदान करावं यासाठी लाखो रूपयांचा खर्च करूनही मतदानाकडे मतदार पाठ फिरवत असतील तर आता याबाबत वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे.