प्रसिध्द मराठी कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मरणार्थ सलग १२ तासांचे काव्यरोंबाट हा कवितेचा कार्यक्रम ५ एप्रलि रोजी महाराष्ट्रातील दिग्गज कवी सादर करणार आहेत. मराठी ग्रंथसंग्रहालयात होणा-या या कार्यक्रमाला महेश मांजरेकर, सुनिल बर्वे, किशोर कदम, अशोक वानखेडे उपस्थित राहणार आहेत. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. अलिकडेच अकाली दिवंगत झालेले गोव्यातील प्रसिध्द कवी गोमंतकचे माजी संपादक होते. त्यांनी ठाण्यातही काही काळ वास्तव्य केलं होतं. त्यांच्या द्वितीय मासिक स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत काव्यरोंबाट हा अखंड १२ तासांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.