कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या निर्बंधात वाढ केली जात आहे. एकीकडे रात्रीची संचारबंदी लागू असतानाच दुसरीकडे आता मैदानं, उद्यानंही बंद करण्यात आली आहेत. कालपासून ठाण्यातील उद्यानं बंद करण्यात आल्याचं दिसत आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सध्या सकाळी फिरायला जाणा-यांची चांगलीच अडचण झाली आहे. हव्याहव्याशा वाटणा-या थंडीत उन्हाचा कवडसा अंगावर घ्यायला बघणा-या ठाणेकरांची अडचण झाली आहे.