ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील १२ तास बंद राहणार आहे. बारवी जलशुध्दीकरण केंद्रात दुरूस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यामुळं हा पाणी पुरवठा उद्या म्हणजे शुक्रवार २० नोव्हेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत म्हणजे १२ तास बंद राहणार आहे. यामुळं दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत काही भागाचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार आहे.