ठाणे शहराचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू न झाल्यामुळे ठाणेकरांची मोठी अडचण

ठाणे शहराचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू न झाल्यामुळे ठाणेकरांची मोठी अडचण झाली आहे. दुरूस्तीच्या कामासाठी शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तासांसाठी बंद करण्यात आला होता. दुरूस्तीचं काम रात्री उशिरा पूर्णही झालं पण शहरातील स्टेम वॉटर पंपिंग स्टेशनमधील जलवाहिनीत गळती होत असल्यामुळे अद्यापही पाणी पुरवठा सुरळीत सुरू होऊ शकलेला नाही. जलवाहिनीच्या दुरूस्तीचं कामही हाती घेण्यात आलं आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच पाणी पुरवठा पूर्ववत होणार असल्यामुळं ठाणेकरांना काही काळ पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. दुपारपर्यंत दुरूस्ती पूर्ण होईल आणि त्यानंतर पुढील तीन तासात शहराला पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल असं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading