ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, घरणे, सभा, उपोषणे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेच सद्या विविध आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंध आदेश जारी करण्यात आले आहेत.
या काळात सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसंच पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींना या मनाई करण्यात आली आहे. २९ मे पर्यंत हा मनाई आदेश लागू राहील असं पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी कळवलं आहे.