ठाणे पालिका क्षेत्रात १८ मे पर्यंत कडक संचारबंदी – भाजी-फळे विक्री बंद

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आज मध्यरात्रीपासून १८ मे पर्यंत संचारबंदीचे कडक पालन करण्यात येणार असल्याचं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे. नागरिकांनीही यासाठी सहकार्य करून ठाण्याला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी कडक शिस्तीचं पालन करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ वैद्यकीय दुकाने, दुधाचा पुरवठा आणि किराणा दुकानं खुली राहतील. भाज्या आणि फळ विक्रेत्यांच्या सेवा मात्र बंद राहणार असल्याची नोंद नागरिकांनी घ्यावी. सकाळी आणि संध्याकाळी चालणंही नागरिकांनी टाळावं असं आवाहन ठाणे पालिकेनं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading