टोमॅटोच्या दरात भरमसाठ वाढ झाली असून सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखायला महाग पडणार आहे. टोमॅटो 100 ते 120 रुपये किलोने विकला जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटोच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. टोमॅटोचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.