ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या नवरात्र उत्सव मंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे .मागील ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यंदाही हा नवरात्र उत्सव मोठा धुमधडाक्यात पार पडणार असून यंदाचा देखावा आयोध्या नगरीतील राम मंदिराची प्रतिकृती असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते आरती देखील करण्यात आली. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची सुरुवात केली. या नवरात्र उत्सवातील देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या ७ दिवस येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे आकर्षक देखावा हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
You must be logged in to post a comment.