ठाण्यातील जय अंबे माँ विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा नवरात्रौत्सव प्रसिध्द आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या उत्सवाला मोठं रूप मिळवून दिलं. टेंभीनाका येथे बसवण्यात आलेली देवी नवसाला पावते अशी श्रध्दा आहे. मात्र कोरोना निर्बंधांमुळे यंदा नवरात्रौत्सव अतिशय साधेपणानं करण्यात येत आहे. नेहमीचा भव्य मंडपही यंदा कमी करण्यात आल्याचं दिसत आहे. मंडपामध्येच फक्त रोषणाई करण्यात आली असून सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती.