युद्धस्य katha’ नेहमीच चित्थरारक असतात. मग त्या कथा,कादंबरी अथवा चित्रपट माध्यम असो. पण ती कथा,कथा नायकाच्या तोंडून प्रत्यक्ष एकायला मिळण्याचा योग अतिशय दुर्मिळ असतो.
आणि जेव्हा त्या कथा नायकाला त्याच्या पराक्रमा बद्दल देशातील शोर्याचे सर्वोच्च पदक ‘ परमवीर चक्र मिळाले असते, तेव्हा तो योग निश्चित ‘ अमृत योग ‘ म्हणावयास हवा. शाळेत आयुष्यातील अमृत योग अनुभवयास मिळाला. कारगिल लढाईतील टायगर हिल लढाईतील हिरो मानद कॅप्टन योगिंदर सिंग यादव यांचे वीर रस पूर्ण भाषण झाले. दोन तास त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष लढाईची रोमांचकारीक क्षण जिवंत अनुभवत असताना काळ पण स्तब्ध झाला होता.