जिल्ह्याला पाणी पुरवठा करणा-या धरणात समाधानकारक वाढ नाही

जिल्ह्याला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाण्याच्या पातळीत अजूनही समाधानकारक वाढ होत नसल्याचं दिसत आहे. जुलै महिना संपत आला तरी धरण क्षेत्रात पावसानं विशेष हजेरी लावलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अजूनपर्यंत पुरेसा पाऊस पडलेला नाही. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या या धरणात ४६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. म्हणजे ४९ टक्के इतकाच पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आत्तापर्यंत ६२ टक्के धरण भरलेलं होतं. तर बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या या धरणात १५७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे ४६ टक्के इतकाच पाणी साठा आहे. गेल्यावर्षी आत्तापर्यंत ८४ टक्के इतकं धरण भरलेलं होतं. त्यामुळं यंदा पावसाची स्थिती सुधारली नाही तर जिल्ह्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची भीती आहे. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कमी होत असल्यानं शेतकरी वर्गही दुबार पेरणीचं संकट येतंय की काय ह्या संकटात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading