जिल्ह्यामध्ये महिला मतदारांच्या संख्येत वाढ

जिल्ह्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदारांमध्ये 10. 53% वाढ झाली वाढ झाली असून यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 55 लाख 13 हजार 525 मतदार होते. तर या निवडणुकीत 60 लाख 94 हजार 308 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 28 लाख 6 हजार 384 तर महिला मतदारांची संख्या 29 लाख 4 हजार 91 आहे. टक्केवारी मध्ये पुरुष पदार्थ मतदारांच्या संखेत नऊ पूर्णांक 43 टक्के तर महिला मतदारांच्या संख्येत 11.7 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत अवघे बत्तीस मतदार तृतीयपंथी होते यंदा ही संख्या 340 झाली आहे. ही निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी जिल्ह्यामध्ये बहात्तर भरारी पथके नेमण्यात आली असून 21 व्हिडिओ देखरेख पथके तसेच बहात्तर स्थिर देखरेख पथकही राहणार आहेत. या निवडणुकीसाठी 62 हजार कर्मचारी लागणार असून निवडणूक कामात हयगय करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading