जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई, भाजीपाला बाजार, फळबाजार आणि सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आजपासून संपुष्टात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. भाजीपाला बाजार, फळबाजार तसेच भाजीपाला दुकाने वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना विविध निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत कार्यक्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेऊन फळे, भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.