मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी त्यांना सुलभरित्या मतदान केंद्रं उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रं तळमजल्यावर आणली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे राबवण्यासाठी मतदान केंद्रं तळमजल्यावर ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण ६ हजार ६२१ मतदान केंद्र असून लिफ्ट सुविधांसह असलेली २५१ मतदान केंद्र वगळता ६ हजार ३७० मतदान केंद्र तळ मजल्यावर असणार आहेत. यापैकी ५ हजार ५०८ मतदान केंद्र ही तळमजल्यावर तर ८६२ मतदान केंद्र मंडपात असणार आहेत. मतदारयादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून १ लाख ५ हजार ६१० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात ६९ लाख २९ हजार ३८५ मतदार आहेत.