जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ५६८ कोरोना ग्रस्त

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ४२७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२ हजार ५६८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ३ हजार ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ६ हजार ८७८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख २२ हजार ९६५ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ७१२ रूग्ण उपचार घेत असून २३ हजार १७५ कोरोना रूग्ण बरे झाले तर ८३४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार १९२ रूग्ण उपचार घेत असून २४ हजार ८२५ बरे झाले तर ६२० जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ५६२ रूग्ण असून २१ हजार ७१७ बरे झाले तर ५८१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ४२४ रूग्ण उपचार घेत असून १० हजार ६१२ कोरोनातून बरे झाले तर ४२० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ४०८ रूग्ण असून ७ हजार १२४ बरे झाले तर २२५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १४४ रूग्ण उपचार घेत असून ३ हजार ७५३ कोरोनातून बरे झाले तर २८३ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ३५१ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ४ हजार ४०० बरे झाले तर १८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २४१ रूग्ण असून ३ हजार ७६५ कोरोनामुक्त झाले तर ७१ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ५३४ रूग्ण असून ७ हजार ५०४ बरे झाले तर ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading