जिल्ह्यात कोरोना मृत्यूचं प्रमाण चिंताजनक

जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ७८२ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत ८ हजार ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३३९ नवे रूग्ण सापडले तर ९ जणांचा मृत्यू झाला तर आत्तापर्यंत १ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ५९५ नवे रूग्ण, २१ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १९८ नवे रूग्ण ७ मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार ४८३ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज २१६ नवे रूग्ण, १० मृत्यू तर आत्तापर्यंत १ हजार १६४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३५ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ४५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज २५ नवे रूग्ण, ४ मृत्यू तर आत्तापर्यंत ४१० जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५२ नवे रूग्ण, १ मृत्यू तर आत्तापर्यंत ३९५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ८३ नवे रूग्ण, ७ मृत्यू तर आत्तापर्यंत २२७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज २३९ नवे रूग्ण सापडले तर १० जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ७७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading